Sunday 23 March 2014

GK Maharashtra

!!..महाराष्ट्रातील मोठे, लहान, उंच..!!

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई.

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर)

महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा - मुंबई उपनगर (२००१ नुसार)

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा - नंदुरबार.

महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी.
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग)

महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर.

महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई)

महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)




* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.

* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव

मालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात

घेतले जाते.

* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा

पिकविला जातो.

* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती

प्रामुख्याने आढळतात.

* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.

* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.

* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.

* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.

* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.

* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.

* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.

* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.

* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.

* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.

* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.

* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने

बांधला.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.

* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.

* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड

केली.

* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे,

मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.

* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.

* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.

* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)

* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३

कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.

 

No comments:

Post a Comment